

वन आणि कृषी क्षेत्रातील
प्रशासकीय सेवा संधी
भारत हा कृषी प्रधान देशआहे . भारतात आणि महाराष्ट्रातही हजारो वर्षे शेती केली जाते. मात्र भारतातील शेती पारंपारिक पद्धतीने केली जाते. त्यामुळे, शेतीचे तंत्र सुधारावे, शेतीत संशोधन व्हावे यासाठी कृषी विद्यापीठांची निर्मिती स्वातंत्र्योत्तर काळात केली गेली. साधारणतः शेती मध्ये रस असणार्या किंवा शेती संलग्न उद्योग-व्यवसायांमध्ये रस असणारे तरुण कृषी विद्यापीठात येतात. येथे पदवीधर झाल्यानंतर विविध खासगी शेती आधारित उद्योग आणि कंपन्यांमध्ये शेती पद्धती, पाणी, मृदा इ. व्यवस्थापनात कृषी पदवीधर काम करतात.
मात्र या खासगी नोकरी व्यतिरिक्त शासकीय नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतात याची कल्पना बर्याच कृषी पदवीधरांना नसते. यामुळे, कित्येक चांगल्या संधींना ते मुकतात. दुसरीकडे प्रशासकीय सेवेमध्ये कृषी पद्विधारांसाठी विशेष परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा उत्तीर्ण करून, थेट अ आणि ब गटातील राजपत्रित अधिकारी होण्याची संधी कृषी पदवीधरांना मिळते. मात्र याची पुरेशी माहिती नसल्याने कृषी पदवीधर या प्रतिष्ठेच्या करिअरचा विचार करीत नाहीत.
आज आपण कृषी पदवीधरांसाठी असणार्या शासकीय संधींचा विचार करू.
कृषी विषयातील पदवीधरांसाठी इंजिनीअरिंग परीक्षांच्या धर्तीवर कृषी सेवा परीक्षा घेते. या परीक्षेचा फायदा हा असतो कि केवळ कृषी पदवीधरांसाठी हि परिक्ष असल्याने, स्पर्धा युपीएससी किंवा एमपीएस सी च्या तुलनेत बरीच कमी असते, आणि मिळणारी पदे फार प्रतिष्ठेची असतात.
महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
महाराष्ट्रात विविध जिल्हे आणि ताल्कुक्यांमध्ये कृषी योजना बनवणे आणि राबवणे यासाठी कृषी अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. या अधिकाऱ्यांची निवड महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा या द्वारे केली जाते. सदर परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेते.
पात्रता: बीएस्सी (कृषी, वनशास्त्र, फलोत्पादन किंवा बीटेक (कृषी अभियांत्रिकी). पदवीच्या शेवटच्या वर्षास असलेले विद्यार्थी सुद्धा परीक्षेस पात्र असतील, मुख्य परीक्षेपर्यंत पदवी पूर्ण करणे आवश्यक ठरते.
परीक्षेचे स्वरूप:
परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते.
१. पूर्व परीक्षा- २०० गुण
२. मुख्य परीक्षा- ६०० गुण आणि
३. मुलाखत -७५ गुण
परीक्षेचे स्वरूप:
पूर्व परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असते.
१. मराठी - ३५ प्रश्न, ३५ गुण
२. इंग्रजी -३५ प्रश्न ३५ गुण
३. सामान्य अध्ययन - ८० प्रश्न ८० गुण
४. कृषीविषयक घटक - ५० प्रश्न ५० गुण
अशी एकूण २०० गुणांची परीक्षाहोते एकूण कालावधी दोन तास असून परीक्षा वस्तुनिष्ठ-बहुपर्यायी स्वरुपाची असते.
मराठी मध्ये सर्वसामान्य शब्दसमूह, वाक्यरचना, म्हणी आणि वाक्प्रचार, व्याकरण आणि उतार्यावरील यावर प्रश्न विचारले जातात.
इंग्रजी विषयामध्ये शब्द वाक्यरचना , व्याकरण, उतार्यावरील प्रश्न विचारले जातात.
सामान्य अध्ययनात, भारतीय इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान महाराष्ट्रातील समाजसुधारक, संगणक तंत्रज्ञान, पर्यावरण, चालू घडामोडी यावरील प्रश्न विचारले जातात.
कृषी घटक परीक्षेमध्ये, १)जमिनीचा वापर आणि मुख्य पिके, २) सिंचन पद्धती आणि स्रोत, ३. पशुपालन आणि दुघ्द्व्यावासाय, फलोत्पादन आणि वनोत्पादन, मत्स्यव्यवसाय आणि कृषी अर्थशास्त्र यावर प्रश्न विचारले जातात .
मुख्य परीक्षा:
मुख्य परीक्षेमध्ये दोन विषय असतात. हे प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात
१. कृषी विज्ञान- १०० प्रश्न २०० गुण. या परीक्षेचे काठीण्य कृषी पदवी च्या पातळीचे असते . यासाठी एक तास कालावधी असतो.
२. कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी या विषयातून एक वैकल्पिक विषय निवडायचा असतो. यात २०० प्रश्न ४०० गुणांसाठी विचारले जातात. प्रश्नपत्रिकेची काठीण्य पातळी त्या त्या विषयाच्या पदवी परीक्षेच्या पातळीतुल्य असते.
२. महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
महाराष्ट्र वनांचा प्रदेश आहे. भारतीय मानकानुसार किमान ३३% भूप्रदेश वानंखाली असणे आवश्यक आहे. मात्र ते प्रमाण भारतात आणि महाराष्ट्रात कमी आहे. महाराष्ट्र विविध वन उत्पादनांनी आणि प्राण्यांनी समृद्ध प्रदेश आहे. त्यामुळे वनांचे क्षेत्र, प्राण्यांची शिकार यामुळे वन अधिकार्यांवरील जबाबदारी वाढते. हे वन अधिकारी महाराष्ट्र वनसेवा परीक्षेद्वारे नियुक्त जातात.
सहाय्यक वनरक्षक (गट - अ) आणि वनक्षेत्रपाल (गट- ब) अशा दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते.
वनस्पती शास्त्र, कृषी, गणित रसायन शास्त्र, भूशास्त्र, सांख्यिकी प्राणीशास्त्र, भौतिक शास्त्र उद्यानविद्या या विषयातील पदवीधर या परीक्षेस बसू शकतात. त्याचबरोबर किमान शारीरिक क्षमता असणे आवश्यक असते.
परीक्षेचे स्वरूप:
परीक्षा पूर्व , मुख्य आणि मुलाखत अशा तीन स्वरुपात होते. प्रुव आणि मुख्य दोन्ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतात
पूर्व परीक्षा १०० गुणांची असून त्यात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, चालू घडामोडी, सामान्य बौद्धिक चाचणी आणि सामान्य विज्ञान यावर प्रश्न विचारले जातात.
मुख्य परीक्षेत दोन विषय असतात.
पहिला विषय सामान्य अध्ययनाचा असतो. यात १०० प्रश्न २०० गुणांसाठी विचारले जातात. याला एक तसच वेळ असतो. भारतीय आणि महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक आणि आर्थिक बाबी, भारतीय राज्यघटना, स्तानिक आणि ग्रामीण जीवन, आणि आर्थिक व सामाजिक विकास यावर प्रश्न विचारले जातात.
दुसरा पेपर हा पर्यावरण संरक्षण या विषयावर असतो १०० प्रश्न २०० गुणांसाठी विचारले जातात. त्या विषयातील पदवी च्या पातळीचे प्रश्न विचारले जातात.
मुलाखत ५० गुणांची होते.
३. भारतीय वनसेवा परीक्षा
महाराष्ट्राप्रमाणेच केंद्र शासन सुद्धा वान्सेवा परीक्षा घेते. वनस्पती शास्त्र, कृषी, गणित रसायन शास्त्र, भूशास्त्र, सांख्यिकी प्राणीशास्त्र, भौतिक शास्त्र उद्यानविद्या या विषयातील पदवीधर या परीक्षेस बसू शकतात. त्याचबरोबर किमान शारीरिक क्षमता असणे आवश्यक असते.
याची पूर्वपरीक्षा ही केंद्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षेबरोबरच होते.
मुख्य परीक्षा:
मुख्य परीक्षा १४०० गुणांची असते. मुख्य परीक्षा दीर्घोत्तरी स्वरुपाची असते.
१. इंग्रजी- ३०० गुण
२. सामान्य अध्ययन ३०० गुण
३. दोन वैकल्पिक विषय- २०० गुण प्रत्येकी
त्यामुळे कृषी किंवा इतर विषयात पदवीधर झालेल्यांनी चाकोरीबद्ध क्षेत्रांचा विचार न करता, प्रशासकीय सेवांचा विचार नक्की करावा. या पदांमध्ये खूप प्रतिष्ठा आहे, पैसा आहे आणि आपल्या क्षेत्रात भरीव असे कार्य करून दाखवण्याची संधी सुद्धा!

स्थापत्य अभियांत्रिकी मधील शासकीय संधी
अभियांत्रिकी हि एक अतिशय मनाची पदवी. त्यातूनही स्थापत्य अभियांत्रिकी होणार्या विद्यार्थ्यांचं प्रमाण अधिक आहे. अभियांत्रिकी झाल्यानंतर नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. प्रत्येकाला योग्य दिशा सापडेलच असे नाही. त्यामुळे अभियांत्रिकी करून उपयोग काय असे लागते. अशा वेळेस स्थापत्य अभिय्क़्न्त्रिकि झालेल्या मुलांना महाराष्ट्र शासनात एक सन्मानाची नोकरी वाट पाहत उभी असते याची कल्पना नसते. तीही अ आणि ब गटातील राजपत्रित पदे. एकतर अभियांत्रिकी पदवी आणि वर महाराष्ट्र शासनात, त्यामुळेया पदांची प्रतिष्ठा काय असेल याची तुम्ही कल्पना करूशकता.
मागील लेखामध्ये आपण भारतीय प्रशासनातील अभियांत्रिकी सेवांबद्दल माहिती घेतलि होती. त्याच धर्ती वर महाराष्ट्र शासन अभियांत्रिकी सेवा परीक्षाघेते. त्या सेवांची माहिती घेऊ.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा
महाराष्ट्र अभियांत्रिकी परीक्षा गट अ आणि गट ब अशा दोन पदांसाठी घेतली जाते. हि दोन्ही पदे राजपत्रित आहेत.
गट अ
महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मध्ये खालील दोन पदांसाठी परीक्षा होते-
सहाय्यक कार्यकारी अभियंता- गट अ (स्थापत्य)
सहाय्यक अभियंता- गट अ (स्थापत्य)
पात्रता:
स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी पूर्ण केलेली हवी. शेवटच्या वर्षाला असलेला विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतो मात्र , मुख्य परीक्षेपर्यंत अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते.
परीक्षेचे स्वरूप:
परीक्षा पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन पातळींवर घेतली जाते.
पूर्व परीक्षा
पूर्व परीक्षेत स्थापत्य अभियांत्रिकी या विषयावर परीक्षा होते. १०० प्रश्न १०० गुणांसाठी विचारले जातात. परीक्षेचा दर्जा पदवी च्या पातळीचा असतो. प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात.
मुंबई, औरंगाबाद नागपूर पुणे या चार केंद्रांवर परीक्षा घेण्यात येते.
मुख्य परीक्षा - लेखी ७५० गुण आणि मुलाखत १०० गुण अशी एकूण ८५० गुणांची असते.
लेखी परीक्षेत चार विषय असतात.
१. मराठी, इंग्रजी आणि सामान्य अध्ययन - १५० प्रश्न १५० गुण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
२. स्थापत्य अभियांत्रिकी १- २०० गुण
३. स्थापत्य अभियांत्रिकी २- २०० गुण
४. स्थापत्य अभियांत्रिकी ३- २०० गुण
स्थापत्य अभियांत्रिकी चे विषय दीर्घोत्तरी स्वरूपाचे असतात. मराठीचा दर्जा बारावी तर इंग्रजी आणि सामान्य अध्ययन विषयांचा दर्जा पदवी परीक्षेचा असतो. अभियांत्रिकीच्या विषयांचा दर्जा पदवि चा असतो.
गट ब
महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मध्ये सहाय्यक अभियंता- गट ब (स्थापत्य) या पदांसाठी परीक्षा होते.
पात्रता:
स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी. शेवटच्या वर्षाला असलेला विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतो मात्र , मुख्य परीक्षेपर्यंत अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.
परीक्षेचे स्वरूप:
परीक्षा पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन पातळींवर घेतली जाते.
पूर्व परीक्षा
पूर्व परीक्षेत स्थापत्य अभियांत्रिकी या विषयावर परीक्षा होते. १०० प्रश्न १०० गुणांसाठी विचारले जातात. परीक्षेचा दर्जा पदवी च्या पातळीचा असतो. प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात.
मुंबई, औरंगाबाद नागपूर पुणे या चार केंद्रांवर वारीक्षा घेण्यात येते.
मुख्य परीक्षा - लेखी ५५० गुण आणि मुलाखत ७५ गुण अशी एकूण ६२५ गुणांची असते.
लेखी परीक्षेत चार विषय असतात. सर्व विषय वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात.
१. मराठी, इंग्रजी आणि सामान्य अध्ययन - १५० प्रश्न १५० गुण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
२. स्थापत्य अभियांत्रिकी १- १०० प्रश्न -२०० गुण
३. स्थापत्य अभियांत्रिकी २- १०० प्रश्न -२०० गुण
मराठीचा दर्जा बारावी तर इंग्रजी आणि सामान्य अध्ययन विषयांचा दर्जा पदवी परीक्षेचा असतो. अभियांत्रिकीच्या विषयांचा दर्जा अभियांत्रिकी पदवीचा असतो.
अभ्यास कसा कराल?
मराठी आणि इंग्रजी व्याकरणाची अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. प्रामुख्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना उपयुक्त अशी पुस्तके उपयुक्त आहेत. सामान्य अध्ययनासाठी चालू घडामोडी आणि भारतीय इतिहास, सामान्य विज्ञान, भूगोल यांची बाजारात उपलब्ध असणारीन्स्पर्धा परीक्षांची पुस्तकेघ्यावीत .
अभियान्त्रीकि विषयाचा अभ्यास तुमच्या पदवी परीक्षेतूनच करावा. गट ब परीक्षेतील प्रश्न बहुपर्यायी असल्याने तेप्रष्ण विचारले जातात याचा अंदाज येण्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्न पत्रिका पहाव्यात. दिल्ली तील क्लासेसच्या नोट्स सुध्दा मिळू शकतात. नेट वरून या क्लासेसच्या दूरस्थ शिक्षण व्यवस्थेची माहिती घेता येईल.
तेंव्हा अभियांत्रिकी झाल्यावर हातात पदवीचे गुंडाळे घेऊन चारचौघांसारखे नोकरीच्या बाजारात फिर्ण्याप्र्क्षा एक प्रशासकीय परीक्षा देऊन सज्ज व्हा महाराष्ट्र शासनातील प्रतिष्ठित पदांसाठी!!